शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

आजरा कारखाना आजी-माजी संचालकांचा ऊस बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:02 IST

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस माजी संचालकांसह काही विद्यमान संचालकही बाहेरच्या कारखान्याला पाठवित आहेत. कारखाना टिकविण्याची जबाबदारी आजी-माजी सर्वच संचालकांवर असताना संचालकच ऊस बाहेर पाठवित असल्याने शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था आहे.चालू हंगामात सर्वच कारखान्यांना तोडणीच्या अपुºया यंत्रणेची अडचण येत आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांकडे तोडणीची पुरेशी यंत्रणा नसल्याने ...

कृष्णा सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : आजरा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस माजी संचालकांसह काही विद्यमान संचालकही बाहेरच्या कारखान्याला पाठवित आहेत. कारखाना टिकविण्याची जबाबदारी आजी-माजी सर्वच संचालकांवर असताना संचालकच ऊस बाहेर पाठवित असल्याने शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था आहे.चालू हंगामात सर्वच कारखान्यांना तोडणीच्या अपुºया यंत्रणेची अडचण येत आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांकडे तोडणीची पुरेशी यंत्रणा नसल्याने ऊस गाळपास जाण्यास विलंब होत आहे. त्याचप्रमाणे cआजरा कारखान्यातही चालू हंगामात अपुरी यंत्रणा आहे. त्यामुळे भागातील ऊस उचलणे जिकिरीचे बनले आहे. तरीदेखील भागातील उसाला प्राधान्य देण्याची गरज आहे.ज्या संचालकांनी कारखान्याच्या जिवावर अनेक वर्षे सत्ता उपभोगली, ऐश्वर्य पाहिले तेच आजी-माजी संचालक कारखान्याला आधार देण्याची गरज असताना बाहेरील कारखान्यांना ऊस देऊन घरचा संसार मोडण्यास हातभार लावत आहेत. कारखाना प्रशासनात काही त्रुटी असल्यास त्या दाखवून देऊन सुधारण्याची संधी देणे अपेक्षित आहे. मात्र, बाहेरील कारखान्याला ऊस देऊन डाव मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे.प्रशासनात काही चुका वाटत असल्या तरी शेतकºयांची बिले वेळेवर जमा होत आहेत. केवळ राजकारणासाठी अन्य कारखान्यांना प्राधान्य देणे व्यर्थ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. चुकीच्या कारभाराविरोधात प्रहार करण्यास रान मोकळे आहे. मात्र, बाहेर ऊस देऊन आपल्याच पायावर दगड मारून घेतल्यासारखे आहे.हेवेदावे बाजूला ठेवण्याची गरजविभागातील सहकारी तत्त्वावरील एकमेव कारखाना आहे. तो टिकविण्यासाठी आजी-माजी सर्वच संचालकांनी एकत्र बसून कारखाना टिकविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे.संचालक पदापुरता आपला कारखानाआजरा कारखाना सहकारी तत्त्वावरील विभागातील एकमेव कारखाना आहे. खासगी कारखान्यांना ऊस घालणाºयांचे हाल वाईट होणार आहेत. त्यामुळे संचालकापुरता आपला कारखाना म्हणणे ही मानसिकता चुकीची असून हक्काचा कारखाना अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.प्रशासनाकडून प्रबोधनाची गरजकारखान्याला ऊस पाठविण्यासाठी सभासदांमध्ये जाऊन प्रशासनाकडून प्रबोधन होताना दिसत नाही. टोळ्या नसल्याने उत्पादक सेंटरचे दरवाजे झिजवत आहेत. पर्यायाने त्यांना अन्य कारखान्यांना ऊस द्यावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनानेही सभासदांपर्यंत जाऊन आजºयालाच ऊस देण्यासाठी आवाहन करण्याची काळाची गरज आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर